‘रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येवू देत नाहीत, राज्य सरकारची सुरु आहे बनवाबनवी’

‘रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येवू देत नाहीत, राज्य सरकारची सुरु आहे बनवाबनवी’


एकिकडे रूग्णांची संख्या वाढते आहे. रूग्णांना दाखल करून घेत नाहीत, रूग्णवाहिका नाहीत मुंबईत हाँँस्पिटल उभे केले तर डाँँक्टर नाहीत, नर्स नाहीत, असे एकिकडे चित्र तर दुसरीकडे रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येवू देत नाहीत. तिसरीकडे केंद्र सरकारकडून मदत आलीच नाही असे सांगीतले जाते आहे. महाराष्ट्रात सरकारची ‘अशी ही बनवाबनवी’ सुरू आहे, असे सांगत भाजपा नेते आमदार अँँड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

महाराष्ट्रात दुर्दैवाने रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. विशेषतः मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे. कधी वरळी पँटर्न, कधी मुंबई पँटर्न असे नवे नवे स्वतःच्या कौतुकाचे पँटर्न तयार केले जात आहेत. केंद्रीय प्रधिकरणांंचे, पथकांचे खोटे हवाले देऊन महाराष्ट्र सरकार आपले कौतुक करीत आहे. मुंबईत कोरोना रोखन्याच्या कामाचे निती आयोगाने कौतुक केले असे खोटे वृत्तही महाराष्ट्रात पसरवण्यात आले. त्यावर निती आयोगाने तातडीने खुलासा करून अशा प्रकारे कोणतेही कौतुक करण्यात आले नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारची ‘बनवाबनवी’ सुरू आहे.

त्यासोबतच केंद्र सरकार बाकी देशातील सर्वच राज्यांना मदत देते आहे आणि एकटया महाराष्ट्रावरच अन्याय करते आहे, असे खोटे चित्र महाराष्ट्रातील राज्य कर्त्यांकडून तयार केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर केंद्राकडून एकही पीपीई किट आले नाही, असे सांगितले तसेच जीएसटी परताव्याबाबतही भाष्य केले. एसटीच्या मंत्र्यांनी जीएसटीबाबत बोलल्यावर त्यांना विषय समजेल असे नाही. त्याना देण्यात आलेल्या कागदावरील माहिती वाचली तरी, प्रत्यक्षात सत्य मात्र वेगळे आहे.

केंद्र सरकारकडून १० एप्रिल पासून २७ मे अखेर दिलेल्या माहिती नुसार राज्य सरकारला एन- ९५ मास्क एकुण १५ लाख ०८ हजार ४०० तर पीपीई किट ९ लाख ८२ हजार ७३० आले आहेत. पीपीई किटचा उल्लेख केंद्र सरकार ‘कव्हर्र आँँल’ असा करण्यात हे बहुधा महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना माहित नसल्याने ते पीपीई किट आलेच नाहीत, असे सांगत आहेत. हात मोजे १ लाख ६८ हजार आले आहेत. गाँँगल्स ५ लाख ३ हजार ४२५ या सर्व वस्तु केंद्र सरकारकडून देण्यात आल्या तरीही महाराष्ट्रातील राज्यकर्ते जर काहीच मिळाले नाही असे ओडरत असतील तर मग या वस्तु गोदामांनी खाल्या की काय? कसा सवाल ही आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय जीएसटी परतावा आणि केंद्र सरकारकडून थेट मदत आली नाही असेही ते सांगत आहेत, मात्र आज आम्ही घेतलेल्या माहिती नुसार डिव्होलेशन आँँफ टँक्स मधून कार्पोरेशन टँक्सचे १४७९.८४ कोटी, इन्कम टँक्स १३७५.९८ कोटी, सेंट्रल जीएसटी २०८०.२२ कोटी, कस्टम ४२८.९६ कोटी, युनियन एक्साईज ड्यूटी २८०.२८ कोटी, सर्विस टँक्स ३.६६ असे एकुण ५६४८.९४ कोटी रूपये केद्र सरकारकडून राज्याला मिळाले आहेत, याची सविस्तर माहिती उघड करून आमदार अँँड आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील सरकार ‘अशी बनवाबनवी’ करते आहे, असा टोला लागावला आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook