RTE Admission: 'आरटीई' प्रवेश दोन दिवसांत होणार सुरु

RTE Admission: 'आरटीई' प्रवेश दोन दिवसांत होणार सुरु


RTE Admission: यंदाची प्रवेश प्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधारकार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, मुलांकडे आधारकार्ड नसल्यास, ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात.


शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत मुलांचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून सूचना आल्यानंतर, प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

आधारकार्ड अनिवार्य
‘आरटीई’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू व्हावी, अशी पालक आणि संघटनांची मागणी असते. यंदाची प्रवेश प्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधारकार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, मुलांकडे आधारकार्ड नसल्यास, ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात.

दोन दिवसांत सूचना
या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास, प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल का, अशा काही शंकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यावर येत्या दोन दिवसांत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. पालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी आणि कागदपत्रांसाठी https://student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन गोसावी यांनी केले आहे.

‘...तर शाळांवर कारवाई’
‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत राज्यातील शाळांची नोंदणी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत जाणीवपूर्वक समाविष्ट न होणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. काही शाळांचा प्रवेश प्रक्रियेत ऑटोमॅटिक संगणकीय प्रणालीद्वारे समावेश करून घेण्यात येत आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. सध्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२० शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यात एक लाख एक हजार ८८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे ‘आरटीई पोर्टल’वरून स्पष्ट होते.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook